धर्माच्या व्याख्या


महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्म ह्याबद्दल चे विचार :

बाबासाहेब म्हणतात
जरी मी धर्माच्या व्याख्याची निंदा करतो ह्याचा अर्थ असा नाही कि धर्माची आवश्यकता नाही आहे .
तर धर्म हि अशी गोष्ट आहे ह्याच्या वरती सगळ्या नागरिकांची आणि सरकारांची धोरणे अवलंबून आहेत .
ते म्हणत खरा धर्म जो आहे जो जुन्या चाली रीती , परंपरा , जातिप्रथा ,रूढी सोडून येऊन एकत्र येऊन काम करेल तोच खरा धर्म असेल . ते ह्याबाबतीत सहमत होते कि धर्माची आवश्यकता आहे . त्यांच्या दृष्टिकोनातून धर्मामध्ये बदल हि खूप गरजेची गोष्ट आहे .

त्यांच्या मते धर्मात बदल करण्यासाठी आवश्यक मुद्दे हे आहेत :

१. हिंदू धर्माची केवळ एक म्हणजे एकच मान्य केलेली पुस्तक किंवा ग्रंथ असायला पाहिजे , ज्या ग्रंथाला सारेच्या सारे हिंदू मान्य करतील आणि स्वकारतील .
२. वेद ,पुराण आणि शास्त्र यांना पवित्र मानने हे बंद केले पाहिजे जर ह्याचा उपयोग झाला तर त्याच्यावरती दंड ठोठावले पाहिजेत .
३. सर्वात चांगली बाब म्हणजे हिंदूंमध्ये असलेले पुरोहितशाही म्हणजेच ब्राम्हिन शाही नष्ट करण्यात येईल पण असे घडणे असंभव आहे त्यासाठी ब्राम्हिणशाही हि वडिलोपार्जित नसायला पाहिजेल .
४. जो व्यक्ती स्वतःला हिंदू समजत आहे अश्या व्यक्तीने राज्यसेवेच्या सनदी परीक्षा पास करून पुजारी बनण्याचा अधिकार असायला हवा . म्हणजे राज्यसेवा सनदी परीक्षा पास झाल्या नंतरच तुम्ही पुजारी बनू शकता.
५. जो व्यक्ती राज्यसेवेच्या सनदी परीक्षा पास नसेल तो व्यक्ती पुजारी बनायच्या  पात्रतेचा नसेल .
६. ज्याच्या कडे पुजारी राज्यसेवा पास झालेली सनद नसेल तशी पदवी नसेल तर असा व्यक्ती दंड अर्थात सजा होण्यास पात्र ठरेल  
७. एखादा पुजारी हा सरकारने नियुक्त केलेला असावा , ज्याच्याकडे नैतिकता , आस्था आणि पूजा ह्या गोष्टींमध्ये शासनाने सांगितलेली बंधने असावीत .
अश्या सोबत तो एक भारतीय नागरिक असावा .
८. पुजारी यांच्या संख्येवर शासनाचा संख्येच्या बाबतील लक्ष्य असावे . कि आता फक्त १०० च पुजारी असायला हवे असे.
काही व्यक्तींना ह्या गोष्टी खूप सुधारणावादी वाटत असतील
९. जेवढे नियम इंजिनेर ,डॉक्टर ,वकील , शिक्षक त्यांच्या व्यवसायात पाळत  असतील मला नाही वाटत कि पुजारी त्यांच्या व्यवसायात एकदम कठोर नियम पाळत असतील .
१०. हिंदू धर्मा मध्ये पुजारी चा असा व्यवसाय हा  एकदम  घृणास्पद  आहे , कि त्यामध्ये पदवीची  गरज नाही आहे , अटी  नाही आहेत तो फक्त ब्राम्हिन असला पाहिजेल , मग तो आजारी असो , अक्कलशून्य असो व अशिक्षित असो . धर्माचे ठेकेदार ब्राम्हिन असणे हे चुकीचे आहे आणि अंत्यंत घृणास्पद आहे ज्याने हिंदू धर्मात चुकीच्या चालीरीती , सामान्य जनतेची पिळवणूक आणि फसवणूक होऊ शकते . ह्यामुळे हिंदूंची एकता  कमी होऊ शकते आणि हिंदू धर्मात फूट पडू शकते .

११. पुरोहित ब्राम्हिन वर्गाला विधेयक लावून नियंत्रित आणले पाहिजे . असे केल्यास हे लोक सामान्य जनतेची फसवणूक आणि पिळवणूक करणार नाहीत .
आणि पुजारी बनण्याची संधी सर्व जाती समुदायातील व्यक्तींना मिळेल .
१२. ह्या वरील गोष्टी करून देशातील कुप्रथा बंद होतील , जातिप्रथा बंद होतील आणि ब्राम्हिणवाद , ब्राम्हिणशाही नष्ट होईल ..

१३. जो पर्यंत भारत देशातून ब्राम्हिन वाद  मिटणार नाही तो पर्यंत हिंदू मध्ये एकी होणार नाही , ह्या साठी ब्राम्हिन समाजाकडून स्वागत झाले पाहिजे . तरच जातिप्रथा मिटतील .

१४. देशात समाजवाद , एकता आणायची असेल तर ह्या देशातून शास्त्र, वेद, पुराण , ब्राम्हिन निर्मित ग्रंथ ह्या गोष्टींचा त्याग करायला हवा. तरच ह्या देशातून जातिप्रथा निघून जातील  आणि भारत महासत्ता बनेल .

Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम