[ कार्ला लेणी ]

 मित्रानो , मी महेश शिंदे 


नमो बुध्दाय 


 [ कार्ला  लेणी  ] 


२०१६ ला माझे लग्न झाले आणि मी बंधनात  अडकलो , लग्नानंतर पत्नीच्या नोकरी च्या कारणाने लोणावळा इथं ट्रैनिंग साठी तिला सोडण्यासाठी लोणावळा याठिकाणी जायचा योगायोग आला , 

नुकताच लग्न झालेला मी पत्नीचा आग्रह, घरी परतण्याच्या आधी लोणावळ्यामधे चांगल्या ठिकाणी फिरायला घेऊन जावे . 

मी हि ठरवले ठीक आहे हीची इच्छा पूर्ण करावी . 


नुकताच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा [बुद्ध आणि त्याचा धम्म ] हे पुस्तक वाचलेला मी . 

लोणावळ्याच्या परिसरात कारल्याला बौद्ध कालीन लेणी आहेत आणि आपण कधीना कधी तरी पाहायच्या अशी माझ्या मनात सुद्धा  इच्छा होती . 


तिला म्हणालो  ठीक आहे आपण जाता  जाता अति प्राचीन [बुद्ध लेणी कार्ला लेणी ] पाहायला जायचे त्या ठिकाणी एकविरा आईचे देऊळ आहे . 


पण तिला बुद्ध लेणी आहेत हे माहितीच नव्हते . ती खुश झाली आणि माझ्या मनात चिकित्सा , तर्क , जिगन्यासु वृत्ती चा कल्लोळ माजला . 



लोणावळा पासून दहा किलोमीटर अंतरावर ह्या लेणी आहेत , साध्या  गाड्या हि जातात . 

दिवसाचे लवकर जायचा प्रयत्न केला तर समोर असलेली मळवलिची  [भाज्या लेणी] सुद्धा पाहू शकता त्या तिथून  समोरच पांच किलोमीटर च्या अंतरावर आहेत . एकदम थोडक्या पैश्यात तुम्ही तिथे जाऊ शकता . 


आता काय हिला घेऊन कारला  लेणी मध्ये प्रवेश केला , हि जाम खुश झाली देऊळ पाहून, मी हि  लेणी पाहून खुश ,हि म्हणाली मी दर्शन घेऊन येते  . 


एकविरा देवी हि आगरी कोळी लोकांची देवता मनाली जात्ते . एकविरा देवी हि साक्षात तथागत गौतम बुद्ध यांची माता महामाया देवी आहे . 

एकविरा देवी हि आधीची बौद्ध भिक्षुणी होती . असे तर्क वितर्क आहेत . 


म्हणजे आताचा  [आगरी कोळी] समाज हा पूर्वीचा बौद्ध धम्माचे आचरण करणारा होता .???


मंदिर अलीकडच्या काळातील म्हणजे १२०० शतकानंतरच्या काळातील वाटते पण खडकांत कोरलेल्या लेण्या ह्या २००० वर्षा पूर्वीच्या  वाटतात . 

 


मंदिराचे बांधकाम दगड मातीचे अलीकडच्या काळातील  आणि खडकात कोरलेल्या लेण्या ह्या अतिप्राचीन वाटत होत्या . 

बौद्ध विचारांच्या संस्कृतीमध्ये वैदिक घुसखोरी झाली आहे . तिथे येणाऱ्या व्यक्ती [आताच्या काळातील] ह्या लोकांना खडकात कोरलेल्या लेण्यांचे महत्वच वाटत नसेल . 


एकेकाळी त्या लेण्यांमध्ये [बुद्धम  शरणं गच्छामी]  चा उच्चार केला जायचा , लाखो मैल  प्रवास करून आलेले  ग्रीक लोक , ग्रीक लोकच नाही तर आशिया खंडातील  देशातील कित्येक लोक त्या लेण्यांमध्ये आले असतील . यवनस्य असा ग्रीक लोकांच्या बाबतीत उल्लेख तिथे स्तंभांवर आहे . स्तंभांवर ब्राम्ही लिपीमध्ये लेख आहेत , स्तंभांवर प्रत्येक राजा राणी आणि त्यांच्या प्राण्यांच्या मुर्त्या आहेत . लोकांच्या कल्याणासाठी तथागत गौतम बुद्धांचे उपदेश तळागळा तील लोकांपर्यंत पोचवायचे काम त्यांनी केले होते . दुःख दूर कसे करायचे असा उपदेश हे लोक लेण्यांच्या मार्फत करत .  

काय होतं आणि काय झालं ??? हे पाहून अंतःकरण कधी कधी भावुक व्हायचं आणि कधी कधी ते स्तंभ , लिपी , पाहून मनात तर्क , चिकित्सा आणि कुतुहूल निर्माण व्हायचे . काय करू नि काय झाले होते . ह्याचा फोटो काढू कि त्याचा . 

ह्या लोकांना काय सांगायचे असेल ह्या लेण्यांच्या मार्फत . का त्यांनी ह्याचा आधार घेतला असेल ???


कश्यासाठी त्यांनी ह्या लेण्या स्थापित केल्या असतील असे प्रश्न निर्माण होत होते .   

बायको मात्र माझ्या थोबाडाकडे रागाने बघत  बसायची . झालं का तुझे ???

इथे आलायस पण माझा एकही फोटो नाही , तुझ्याच धुंदीत तू . बिचारी आधी हिरमुसली होती , 

नंतर तिने सुद्धा काही प्रश्न विचारले 




"ह्या ठिकाणी कोणाचे वास्तव्य होते ??"

"ह्या ठिकाणी असलेले लोक कुठे गेले असतील ??"

"ह्या ठिकाणी असलेले मंदिर आणि लेण्या हे एकच आहेत कि वेगवेगळ्या ??? जर एक असतील तर दोन्ही हि ठिकाणी बुद्ध का नाही एका ठिकाणी बुद्धच बुद्ध आहे ते का ??"

"ह्या  लेण्यांच्या मध्ये असलेल्या वारसदारांचे काय झाले असेल ?? 

त्य्यांचे वारसदार कुठं गेले असतील ???"

"कब्जा केला कि अतिक्रमण केले कि लेण्यांत असलेल्या लोकांना मारले ???"


ती पत्नी  हे सर्व प्रश्न विचारू लागली मी हि माझ्या अनुमानावरून उत्तरे देऊ लागलो , 


नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांती प्रतिक्रांती हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या  डोक्यात प्रकाश पडला कि लेण्यांच्यासोबत आणि बौद्ध भिक्षुंसोबत आणि त्यांच्या वारासदारांसोबत म्हणजेच अनुयायांसोबत काय घडले ते 


एक तर त्यांची  कत्तल केली असणार 

एक तर धर्म परिवर्तन झाले असणार 

एक तर विचार हळू हळू बदलत जाऊन मूळ विचार पुसले गेले असतील 

भयानक मोठं षडयंत्र 

आणि जे अनुयायी आहेत ते आताचे MARATHA SC ST OBC NT त्यातल्या त्यात  शूद्र आणि अस्पृश्य  झाले असतील .

  


जाऊदे आता तो काळ वेगळा होता म्हणून मी तिला उत्तरे द्यायचे बंद केले , पण नंतर सगळी लेणी पाहिल्यानंतर मस्त समाधान  वाटले . 

असा योगायोग येत नाही . 

त्यावेळेस ह्या लोकांनी ह्या महापुरुषाला म्हणजेच तथागत गौतम बुद्धाला एवढी महती का दिली होती  ह्याची सविस्तर माहिती डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित [बुद्ध आणि त्याचा धम्म ] मध्ये मिळाली आणि डॉक्टर आ ह  साळुंखे लिखित  [सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध]  मिळाली . 



तेव्हा पासून मला खूप वाईट वाटते ज्या  देशात ज्याने जन्म घेतला , ज्या देशातील लोकांच्या उद्धारासाठी स्वतःच्या सुखाची पर्वा न करता ह्या महापुरुषाने बुध्दाने 

सर्व गोष्टींचा त्याग केला आणि लोकांच्या कल्याणासाठी उपदेश केला त्यांचे दुःख कसे दूर करायचे ह्याबाबतीत उपदेश केला त्याला ह्याच भारतातील लोकांनी दूर सारला . 



किव येते तुमच्या बुद्धीची , बौद्धिक दारिद्र्यात   असलेल्या लोकांना याबाबत काहीच वाटणार नाही पण  ज्यांचे  स्वतःवर आणि स्वातंत्र्त्यावर प्रेम असते त्यांना सर्व जाणून घेण्यात सार्थक वाटते .. 



पोस्ट मधील लेण्यांचे चित्रांकन २०१६ मध्ये झालेले आहे . आता सुद्धा अश्याच अवस्थे  मध्ये आहेत , महायान  पंथाच्या गौतम बुद्ध यांच्या लेण्या आहेत , 

स्तंभावर कोरलेली अतिप्रचीन लिपी सुरुवातीला मी उलघडण्याचा  प्रयत्न केला पण तो सफल झाला नाही . हळू हळू इंटरनेट वर ह्या लिपी बद्दल माहिती मिळते का ते पहिले तिला ब्राम्ही लिपी म्हणतात . 

त्यामध्ये  अ ब क ड कश्याला  म्हणतात हे पाहिलं . नंतर ज्यांना ह्या लिपी बद्दल माहिती आहे त्याबाबद्दल विचारले त्यांनी मार्गदर्शन  केले . 


[वेजयंतितो सेठीना भूतपालेन सेलघरम परिनिठापितम् जंबुदिपम्ही उतमम्’] वैजयन्तिचा श्रेष्ठी भूतपाल याने तयार केलेले हे लेणे जम्बुद्वीपात उत्कृष्ट आहे, असा याचा अर्थ होतो.


नशीब , आत्मा , पुनर्जन्म , देव , नरक , स्वर्ग , ईश्वर , चमत्कार ह्या गोष्टींना काडीचीही किंमत न देण्याऱ्या महापुरुष्याच्या  म्हणजेच तथागत गौतम बुद्धा च्या ह्या लेणी आहेत . 


एकेकाळी मन स्वछ ठेवून लोकांच्या मनोभावे सेवा करणाऱ्या लोकांचा विचार त्या लेण्यांमध्ये शांत पडला आहे . त्या विचारांना पुन्हा जागे करायचे आहे 

कोण होते तथागत गौतम बुद्ध?? आपले आणि त्यांचे नाते काय??  ते फक्त एकाच जातीसाठी होते काय ???त्यांचा इतिहास कोणी लपविला ???


का लपविला ?? कश्यासाठी लपविला ??? त्यांचे विरोध कोणी केले ??? त्यांनी कश्याप्रकारे उपदेश केला ??

ह्याचा सोक्षमोक्ष लावल्याखेरीज मरण आले तरीही चालेल पण सत्य इतिहास समोर आणणारच !!!!


[सत्यशोधक महेश शिंदे ]









































  



 

 

 

   





Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम