सत्यशोधक नेहमीच जागरूक असतो
मला माझा हाच फोटो माझ्या अस्तित्वाची जाणीव करून देतो . खरा इतिहास शोधण्यासाठी व्यक्ती ने नेहमी जागरूक असलं पाहिजे .
हा फोटो काढण्याआधी आणि इथे भेट देण्याआधी जे माझ्या सोबत झाले होते ते मी कधीही विसरणार नाही . आणि माझ्या भावासारख्या प्रताप मित्राला तर कधीच विसरणार नाही . त्याने तर मला म्रुत्यु च्या दाढेतून बाहेर काढले होते.
लेणी पाहण्यासाठी चा उत्साह आणि आनंद पाहून माझा मित्र प्रताप याला घेऊन आम्ही कराडच्या परिसरातील लेणी आगाशिवनगर याठिकाणी भेट देण्यासाठी निघालो .
आधी जखिणवाडी ,नांदलापूर पुर्वीचे नालंदा पुर याठिकाणी भेट देऊन नंतर चचेगाव,आगाशिवनगर मधील लेण्यांना भेट द्यायचे आम्ही ठरवले .
सकाळी सकाळी आईची माया जाताना पोटभरून जेवण केले .
पण सोबत दही भरपूर खाल्ले . पाणी पिले . आणि आम्ही त्याठिकाणी आलो । जखीणवाडीच्या डोंगराच्या खाली आम्ही आमची टुविलर लावली .
आणि आता डोंगरावर चढायचे . डोंगर भरपूर उंच आता काय खरं नाही . पण मनातील जिज्ञासा, आनंद ,उत्साह बघून उंची कमी वाटू लागली . डोंगर चढायला सुरुवात गेली . मला पाच मिनीटाला दम लागायचा . आणि मी थांबायचो आणि थोडं पाणी पियाचो ।
घामेघूम झालो.।.प्रताप आपलं निवांत डोंगर चढत होता . मला जास्त धापा लागत होत्या । ह्रुदयाचं धडधड वाजणं सहज समजून आलं होतं . ह्रदय मोठ्या ने आणि पटपट धडधडत होतं .
डोंगराचा थोडा च भाग चढायचा राहयाला होता मुळ लेण्यात जायचा तो पटपट चढला . लेण्या पाहताच आनंद झाला । समाधानी झालो ।
प्रताप ला म्हणालो आरं "मला जरा धाप लागली आहे . धडधड होत आहे ". त्यामुळे आम्ही समोरच्या लेण्यात विश्रांती घेण्यासाठी आत गेलो .
आणि समोर असलेल्या लेण्यात थंड वाटू लागलं . बोलता बोलता अचानक मला धाप लागू लागली . मी म्हणालो प्रताप मला चक्कर येत आहे . म्हणून मी उटलो तर चक्कर येऊन खाली पडलो . डोळ्याच्या वर मार लागला . नंतर मला दोन मिनीटे जाग नव्हती बहुतेक बेशुद्ध पडलो होतो . त्या नंतर अचानक जाग आली . माझा मित्र प्रताप मला क्रुत्रीम श्वास देत होता . छातीवर दाबत होता . संपूर्ण शर्ट घामाने भिजला होता . अधूनमधून हा शु आणि चप्पल चा वास द्यायचा . आणि माझा घाम पुसत होता .
आणि अधूनमधून त्याचा तसा आवाज रडण्यासारखा .
थोड्या वेळाने मी मोठ्या ने श्वास घेतला आणि जागा झालो..प्रतापच्या जीवात जीव आला . बाजूला लेण्यात आर्कीओलाजी चा सिक्युरिटी होता त्याने साखर दिली खाल्ली ,पाणी दिले पिले.
चालायला च येत नव्हते . तसाच बसून राहयलो . थोड्या वेळाने पोटात उलटी सारखे झाले आणि सकाळचे दही, भात सर्व पाणी बाहेर पडले. पंधरा मिनिटात मि स्वतःला सावरलं . जरा बरं वाटायला लागलं कळायला लागलं की आपण इथे लेण्या पहायला आलो आहोत .
अंगात पुन्हा उत्साह वाढला . मित्र म्हणाला घरी जाऊन डॉक्टरकडे जाऊन मग येऊ .
मी म्हणालो मला काही होत नसतं चक्कर तर येत असतेच. आम्ही माघारी न फिरताच पुढच्या लेण्या पाहण्यासाठी चालायला लागलो . सर्व पाहील्या नंतर आगाशिवनगर मध्ये गेलो तिथल्या ही पाहील्या ।
एकच गोष्ट समजली मित्र हे भावापेक्षा ही श्रेष्ठ असतात . नात्या पेक्षा मैत्री चं नातं मस्त असतं . असा जिवाभावाचा मैतर प्रत्येकाला असावा..
दुसरी गोष्ट तुम्हाला तुमचा संकल्प पुर्ण करायचा असेल आणि तशी चिकाटी असेल तर मग कितीही संकटे आली तरीही तो संकल्प पुर्ण झाल्याशिवाय रहात नाही .
मनाला तसं बनवा की मी करणारचं शरीर ही तसंच साथ देतं .
नंतर मी भरपूर लेण्या पाहील्या एकट्याने . दवाखान्यात ही गेलो सर्व नोर्मल , कोलेस्टेरॉल चेक केलं नोर्मल . व्यायाम ही चालू केला . बारीक सारिक कामं असतील तर करायची . त्याने फिट रहातं ।
फोटो झूम zoom करुन पहाल तर डोळ्याच्यावर झालेल्या जखमे वर पिवळी हळद लावली होती .
【सत्यशोधक महेश शिंदे 】
Comments
Post a Comment