लेण्याद्री कपिचीत लेणी

 सर्वांना क्रांतिकारी जय भीम !!


रविवारी पाच तारखेला संयुक्त लेणी परिषदेच्या माध्यमातून आणि अशोक वॉरियर्स यांच्या माध्यमातून लेण्याद्री  जुन्नर या थेरवादी  लेण्यांना भेट  दिली . 

ठाणे ते लेण्याद्री असा हा प्रवास होता  . खूप दिवसातून लेण्याद्री ला जायचा बेत होता आणि   हा बेत संयुक्त लेणी परिषदेच्या आणि अशोक वॉरियर्स यांच्या माध्यमातून  मला   हि संधी  मिळाली  . 


भरपूर दिवसातून मी लेण्यांना भेट दिली  , काही कारणास्तव लेण्यांना भेट देणे थांबवले होते. त्या दिवशी मनात तळमळ हि होती आणि उत्साह 

चिकित्सेच्या बुद्धीने तिकडे जाण्यासाठी निघालो . 

सकाळी सकाळी मी कल्याण इथून अशोक वॉरियर्स यांना जॉईन केले ,मिनी  बस होती  बस मध्ये समविचारी बांधव आणि भगिनी होत्या , मेजून २५ जणांचा समूह असेल  .  मी त्यांना कल्याण हुन जॉईन झालो  , बस  मध्ये प्रज्योत कदम सर , संतोष वाघमारे सर ,अनिल जाधव  सर , प्रभाकर जोगदंड सर  असे ओळखीचे लेणी संवर्धक होते  , यांच्या मुळे मला लेण्याद्री भेट देण्याची संधी मिळाली  , मी प्रथमतः त्यांच्या आभार मानतो . 


संयुक्त लेणी परिषदेच्या माध्यमातून सर्व लेणी संवर्धक , लेणी अभ्यासक , लेणी संशोधक , फुले शाहू आणि आंबेडकर विचारांचे मित्र  यांनी  सर्वांनी एकत्र येऊन लेणी जागृती करणे , सर्वांनी एकजूट होणे , सर्वांनी मिळून अतिक्रमण विरोधात एकत्र येणे , सर्व लोकांना एकत्रित आणणे हा महत्वाचा मुद्दा होता .


यामध्ये अतुल भोसेकर सर  हे मार्गदर्शन करणार होते 


आम्ही दुपारी १ च्या दरम्यान लेण्याद्री च्या पायथ्याला पोहचलो , कल्याण ते मुरबाड , मुरबाड , माळशेज घाट करत करत जुन्नर ते लेण्याद्री अश्या रूटने आम्ही लेण्याद्रीला पोहचलो  . 

जाताना माळशेज घाट अंगावर  शहारे आणत होता  . उंच उंच डोंगर आणि ते निसर्गरम्य घाट बघून डोळे अगदी विस्फरुण गेले  .  

लेण्याद्री चा डोंगर पाहिल्यानंतर मनात उत्साह आणि चिकित्सा निर्माण झाली  ,  आता आपल्याला पुन्हा माहिती मिळणार , अभ्यास होणार , समविचारी बांधवांच्या भेटी होणार . तीन तासाचा प्रवास करत आम्ही इथे पोहचलो  . 


पायथ्याला परभणी चे पांडुरंग सरकते सर आणि त्यांच्यासोबत असलेले समविचारी बांधव यांची भेट झाली  ,अनिल सर  , प्रभाकर जोगदंड सर प्रज्योत कदम सर आणि माझ्या बस मध्ये असलेले ठाणे हुन आलेले सर्व बांधव यांच्या   सोबत  लेण्याद्री चढायला सुरवात केली . मनात उत्साह असल्याने आणि चिकित्सा असल्याने तहान ,भूक आणि थकवा विसरून गेलो  . कधी एकादशी लेण्यांच्या परिसरात जातोय याची ओढ लागली होती , 


लेण्यांच्या परिसरात  भरपूर गर्दी होती ,माझे डोळे अतुल भोसेकर सर  , अमोल बोर्डे सर , सिद्धार्थ कसबे सर ,सुनील खरे सर  आणि अजून कोणी समविचारी फेसबुक च्या माध्यमातून ओळख झालेल्या लेणी संशोधन करणाऱ्या अभ्यासून व्यक्तींना शोधू लागले , समोरच महेश म्हणून कुमार  सरांनी हाक मारली  , त्यांची आणि माझी ओळख फेसबुक   च्या माध्यमातून झाली होती , पण आता समोर समोर प्रत्यक्षात झाली त्यामुळे आनंद झाला .  सॅन आणि त्यांच्या सोबत आलेले समविचारी बांधव त्यांच्या सोबत हि   ओळख झाली  ... बोलता बोलता समोर अतुल भोसेकर सर दिसले ,

 सरांना भेटल्यानंतर  मी तथागत गौतम बुद्धांच्या भिक्कू  महाकाश्यप यांनाच प्रत्यक्षात भेटत आहे असा अनुभव झाला , फक्त फेसबुकवर बोललो होतो आणि व्हाट्सअप पण आज डायरेक्ट समोर समोर सरांच्या सोबत भेट झाली , खूप बरे वाटले .


सरांसोबत भेट झालानंतर लेण्यात जाऊन जेवण केले , जेवण झाल्यानंतर ,सरांनी आणि इतर लोकानी आपापला परिचय आणि उद्देश समजावून सांगितला . 

पंचशील वंदना  झाल्यांनतर पुढे लेणी , स्तूप , शिलालेख , थेरवादि प्रतीके पहिली  , लेण्यादी ला कापिचीत लेणी असे म्हणतात , 


महाराष्ट्रातील सर्वात मोठे संघराम तिथे आहे , भिक्कू निवासासाठी खोल्या आहे  , पाण्याची पोडी आहे  , असे मिळवून तीस ते चाळीस लेण्यांचा एकाच ओळी मध्ये पाषाणात अचूक कोरलेली लेणी आहेत  . 

शिलालेख आहेत  , शिलालेखात लेणीचे दान कोणी दिले याची माहिती आहे  , संतोष वाघमारे सरांनी शिलालेख वाचून दाखवला , तिथेच सिद्धार्थ कसबे सरांची भेट आणि खरात सरांची भेट  झाली , त्यांना सुद्धा भेटायचे होते , लेण्याद्री भेटीत त्यांची हि  समोर समोर भेट झाली बरे वाटले  , सर्वांच्या सोबत भेटी झाल्या  , माहिती मिळाली , 

समविचारी मित्र भेटले , अतुल भोसेकर सर यांचे मार्गदर्शन मिळाले , अजूनही लेण्याद्रीला भेट देईन कारण एका दिवसात सर्व लेणी समजून घेणे शक्य नाही  . 

सर्वांसोबत आठवण म्हणून फोटो हि काढलेत , जातिव्यवस्थेचे निर्मूलन हे पुस्तक हि भेट मिळाले 


खूप आनंद झाला , चांगला दिवस गेला , अभ्यास झाला , भेटी झाल्या , मार्गदर्शन हि मिळाले  अजूनही भेटी होतील , अजूनही मार्गदर्शन होईल  . 



ज्याप्रमाणे हुएन त्संग म्हणतात पामेर चा पर्वत जरीही माझ्या अंगावर फेकून दिला तरीही मी तथागतांच्या पावन भूमीला जाण्याचा निश्चय कधीही बदलणार नाही 

त्याच प्रमाणे हाच आदर्श ठेऊन जो पर्यंत माझ्या शरीरात रक्त आहे तो पर्यंत बुद्ध , डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी सदैव तयार असणार



नमो बुध्दाय 




जाता जाता एक सांगतो  


*कसलाही मान सन्मानाची अपेक्षा न करता  , अहंकार , पुरस्काराची अपेक्षा , मी भावना , द्वेष , गट तट ,भेद , स्वार्थ हे सर्व बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात लेणी जागृती आणि प्रबोधन केले पाहिजे  आणि तथागत गौतम बुद्ध ,डॉ बाबासाहेब आंबडेकर यांचा खरा सन्मान हाच आहे कि आपण त्यांच्या विचाराने जायचे भलेही एकटे पडला तरीही चालेल . 




सत्यशोधक महेश शिंदे 

7057801271









































































































Comments

Popular posts from this blog

Agashivnagar buddha leni karad आगाशिवनगर बुद्ध लेणी कराड

Nallasopara buddhist stupa , नालासोपारा बुद्ध

बारा बलुतेदार समाज ब्राह्मण विचारांचा मानसिक गुलाम